राष्ट्रवादीचे 9 आमदार संपर्कात: खासदार निंबाळकर
सोलापूर : राज्यातील सत्ता स्थापनेचा वाद दिवसेंदिवस चिघळत असताना, यात आता माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उडी घेतली. राष्ट्रवादीचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा दावा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केला आहे. अनावधानाने जनमताचा अनादर झाल्याचा सांगत त्याला भाजप जबाबाबदार नाही, असंही खासदार निंबाळकर म्हणाले.
खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी माढा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्यावर सरकार टिकणार नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये तात्विक वाद आहे, तो लवकरच मिटेल असंही नाईक निंबाळकर म्हणाले.
No comments